Tuesday, 13 July 2021

बारा वर्षा पासून फरार असलेला आरोपी जेरबंद, शिंदखेड पोलिसांची कामगिरी

बारा वर्षा पासून फरार असलेला आरोपी जेरबंद,
 शिंदखेड पोलिसांची कामगिरी
नितीन पाटील कन्नलवार
वाई बाजार (प्रतिनिधी ) - शिंदखेड पोलीस स्टेशन मधील लॉकअप मधून गेल्या बारा वर्षा पूर्वी पळून गेलेल्या आरोपीस शिंदखेड पोलीस स्टेशन चे स,पो,नि,भालचंद्र तिडके,व त्यांच्या टीमने आरोपी शिवाजी भानुदास शितोळे वय ४० वर्ष रा, नाथनगर,ता,आर्णी, यास यवतमाळ जिल्यातील आर्णी येथून जेरबंद केले, पोलीस स्टेशन शिंदखेड येथील गुरंन ०५/२००८ कलम २२४ भादवी मधील फरारी असलेला आरोपी गेल्या बारा वर्षांपूर्वी शिंदखेड पोलीस स्टेशनच्या लॉक अप मधून पळून गेला होता, सदर आरोपी हा आर्णी येथे रहात असल्याची गोपनीय माहिती मिळल्यावरून दि,१४,०७,२१ रोजी स,पो,नि भालचंद्र तिडके,पो,कॉ,पठाण,
पो,कॉ,सानप,पो,कॉ,कुमरे,पो,कॉ,मोकले, पो,कॉ,नंदगावे, यांनी यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी येथे जाऊन सदर आरोपीस सापळा रचून शिताफीने ताब्यात घेतले,व मा, न्यायालय माहूर यांच्या समोर हजर केले असता मा,न्यायालयाने सदर आरोपीस पंधरा दिवसाची शिक्षा सुनावली असून आरोपीची नांदेड जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे,

Wednesday, 7 July 2021

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या नियोजित जागेचे तब्बल 23 वर्षानंतर भूमिपूजन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या नियोजित जागेचे  तब्बल 23 वर्षानंतर भूमिपूजन
माहूर (प्रतिनिधी) -  7 जुले रोजी बस स्टँड चौक- माहूर च्या प्रांगणात गेल्या 23 वर्षापासून प्रलंबित असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या नियोजित जागेचे  सर्व बांधवांच्या /नगरपंचायत /नगराध्यक्ष व सर्व नगरसेवक यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या थाटाने भूमिपूजन सोहळा संपन्न झाला . तब्बल 23 वर्षानंतर पद अधिकाऱ्यांना जाग आली असेही नागरिकांमध्ये चर्चिले जात होते. या भूमिपूजन सोहळ्यासाठी माहूर( नगराध्यक्षा) कु.शीतल जाधव ,बौद्ध विहार समितीचे अध्यक्ष -तथा पंचशील विद्यालयाचे संचालक आयु- प्रकाश गायकवाड, नगरसेवक दीपक कांबळे, रेणुकादास वानखेडे, पत्रकार सिद्धार्थ तामगाडगे ,राहुल भगत (तालुका अध्यक्ष टायगर सेना) विजय भगत, रेणुकादास पंडित,माधव कांबळे, प्रा- अमोल गायकवाड ,गौतम मुनेश्वर ,शशिकांत भगत ,आदिनाथ खंदारे ,एकनाथ मानकर ,संदेश कायटे, अरविंद कांबळे, विदर्भ न्यूज चे संपादक उमेश लोटे , पत्रकार संगीता ढोके, पद्मा गिऱ्हे ,संजय घोगरे- व सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

केंद्र सरकारने गॅस, पेट्रोल किंमती कमी कराव्यात - वसंतराव देशमुख यांची शासनाकडे मागणी

गॅस, पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन
केंद्र सरकारने गॅस, पेट्रोल किंमती कमी कराव्यात - वसंतराव देशमुख यांची शासनाकडे मागणी
हदगाव  (प्रतिनिधी)- केंद्रातील भाजपा सरकारने पेट्रोल-डिझेल आणि घरगुती गॅसच्या किंमती प्रचंड वाढविलेल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाल्यामुळे या भाववाढीच्या निषेधार्थ नांदेड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने नांदेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांच्या नेतृत्वाखाली हदगाव  शहरात येथे दि.०७ जुलै रोजी मोदी सरकार विरूध्द प्रचंड घोषणेबाजी देत मोदी सरकारच्या विरोधात धरणे आंदोलन करून तीव्र निषेध करण्यात आला आहे. युपीए सरकारच्या काळामध्ये इंधनाच्या किंमती कमी होत्या आता त्या किंमती दुप्पटीने वाढल्या आहेत. या पेट्रोल-डिझेल, घरगुती गॅसच्या किंमती कमी कराव्यात असे मनोगत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हदगाव वसंतराव देशमुख यांनी येथे व्यक्त केले.
केंद्र सरकारने गॅस, पेट्रोल-डिझेल या इंधनाच्या वस्तूमध्ये प्रचंड वाढ केली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांत या भाव वाढीबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष ना.जयंत पाटील यांच्या आदेशानुसार व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष नांदेड हरिहरराव भोसीकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हदगाव शहरामध्ये आंदोलन करण्यात आले. यावेळी मनोगत व्यक्त करतांना हदगाव तालुकाध्यक्ष वसंतराव देशमुख साहेब म्हणाले की, मागील युपीए सरकारच्या काळात गॅस प्रति सिलेंडर 400 रूपये होता आज त्याचे भाव दुप्पट आहे. तसेच पेट्रोल 70 रूपये होते ते आता 107 रूपये प्रति लिटर झाले. डिझेल 50 रू.प्रति लिटर होते ते 87 रू.प्रति लिटर झाले. तसेच इतर खाद्य पदार्थाचे तेल, दाळ व कडधान्याचे भाव प्रचंड वाढले आहे. सर्वसामान्य जनता महागाईच्या चटक्याने होरपळून निघत आहे. केंद्र सरकारने ही भाववाढ त्वरीत मागे घ्यावी,यावर नियंत्रण आणावे असे म्हणत तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हदगाव वसंतराव देशमुख साहेब यांनी केंद्र सरकारच्या धोरणाचा तीव्र निषेध केला. इंधनाच्या किंमती कमी कराव्यात या संदर्भातील निवेदन जिल्हाधिकार्‍यां मार्फत प्रधानमंत्री मोदी यांना पाठविण्यात आले. 
या आंदोलनात कार्यकर्त्यांनी व पदाधिकार्‍यांनी मोदी सरकार विरूध्द प्रचंड घोषणेबाजी दिली व तीव्र भावना मनोगत व्यक्त केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्टी तालुका अध्यक्ष वसंतराव देशमुख, डॉ.देवराव पाटील बाभळीकर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा उपाध्यक्ष, अभिजित रुद्र कंठवार शहराध्यक्ष ,फेरोजखान मं अली खान शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अमोल कदम राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पार्टी तालुकाध्यक्ष, प्रा.राजेश राऊत सर अध्यक्ष सामाजिक न्याय विभाग हदगाव , राजु पाटील कदम माजी तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी,निहाल खान पटेल शहर उपाध्यक्ष,प्रशांत सिंगनवाड शहर सचिव , सुनील मगर शहर सरचिटणीस , फयाज खान अहेमद खान शहर कार्याध्यक्ष , देवा पाटील मार्लेगावकर तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मिडिया,शुभम कदम तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विद्यार्थी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने यावेळी उपस्थिती होती.

बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांसोबत खासदार हेमंत पाटील यांनी केला वारंगा ते मांडवी दौरा ; लवकरच मिळणार नेटवर्क आणि ब्रॉडबँडची दर्जेदार सुविधा

बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांसोबत खासदार हेमंत पाटील यांनी  केला वारंगा ते मांडवी दौरा ;  लवकरच मिळणार नेटवर्क आणि ब्रॉडबँडची दर्जेदार सुविधा
विनोद भारती
माहूर (प्रतिनिधी )  : हिंगोली  लोकसभा मतदारसंघातील वारंगा ते मांडवी दरम्यान नेटवर्कच्या आणि दूरध्वनी सेवेच्या येणाऱ्या अनेक अडीअडचणी बाबत खासदार हेमंत पाटील यांनी बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन पाहणी केली व हदगाव,माहूर,किनवट यासह इतर एक्सचेंज कार्यालयातील असुविधांची पूर्तता करण्यात यावी याबाबत संबंधितांना निर्देश दिले . सध्या पीकविमा भरण्यासाठी आणि बँकेचे  व्यवहार सुरळीत होण्यासाठी इंटरनेट नेटवर्कचा मोठा अडथळा जाणवत असून या पार्श्वभूमीवर खासदार हेमंत पाटील यांनी अधिकाऱ्यांना सोबत घेऊन सर्वसामान्य जनतेला येणाऱ्या अडचणीची जाणीव करून दिली. या दौऱ्यामुळे मोठा सकरात्मक बदल होणार असून,नागरिकांना लवकरच दर्जेदार सुविधा मिळणार आहेत. 
          खरीप हंगाम सुरु झाल्यानंतर पीकविमा आणि पीककर्जाचे  आवेदन पत्र भरण्यासाठी शेतकऱ्यांची बँक आणि अर्ज भरणा केंद्रावर गर्दी होत आहे.  परंतू मागील बऱ्याच दिवसापासून हिंगोली लोकसभा मतदारसंघातील बीएसएनएल ची नेटवर्क सेवा कोलमडली असून यामुळे शेतकऱ्यांना तासनतास ताटकळत बसावे लागत आहे . त्यामुळे अनेक जण पिक कर्ज आणि पिकविमा सुविधेपासून वंचित आहेत.  गतवर्षी  हि संख्या हजारोच्या आसपास होती . किनवट येथील मका ज्वारी खरेदी केंद्रावर  सुद्धा हीच परिस्थिती असल्याने राज्यशासनाला दुबार ऑनलाईन अर्ज मागवावे लागले होते . यामुळे शेतकऱ्याना आर्थिक भुर्दड सहन करावा लागला होता . याबाबत खासदार हेमंत पाटील यांच्याकडे अनेक तक्रारी आल्यानंतर आणि माहुर, मांडवी येथील पदाधिकार्यांकच्या मागणीवरून   तातडीने यावर उपाययोजना करण्यासाठी बीएसएनएल च्या अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन यावर तोडगा काढण्यासाठी मतदारसंघातील  सर्वच एक्सचेंज कार्यालयात भेटी दिल्या या दरम्यान खासदार हेमंत पाटील यांनी नांदेड जिल्हा बीएसएनएल चे महाप्रबंधक आणि इतर तांत्रिक अधिकाऱ्यांना सोबत घेतले होते .आणि हिंगोली लोकसभा मतदार संघात येणाऱ्या वारंगा ते मांडवी दरम्यान बीएसएनएल च्या   कार्यालयाची   प्रत्यक्ष पाहणी केली व समस्यां जाणून घेतल्या . सर्वच  ठिकाणच्या नेटवर्क  आणि ब्रॉडबँड , साफसफाई, स्पीड, रूट OFS एक्सचेंज नेटवर्क, विभागाची पाहणी केली. दरम्यान त्यांनी वारंगा , मनाठा , बरड शेवाळा , पळसा निवघा , तळणी, कोहळी , उमरखेड, धनोडा , महू, आष्टा , वाई , दहेली तांडा , सारखणी , मांडवी , वानोळा, कुपटी, किनवट , बोधडी , जलधारा , पाटोदा , इस्लापूर, अप्पाराव पेठ , शिवणी ,बोधडी तांडा, उमरी बाजार, हिमायतनगर, जवळगाव , सरसम , दरेसरसम , वाळक्याची वाडी या ठिकाणी भेटी देऊन याठिकाणी असलेल्या आणि नसलेल्या  यंत्रणेची माहिती घेतली व तात्काळ या ठिकाणी सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांना दिले . कमी असलेल्या बाबींची  पूर्तता तात्काळ करून मतदारसंघातील सर्व सामान्य जनतेला नेटवर्क आणि ब्राँडबँड च्या दर्जेदार  सुविधा देण्यात याव्यात असेही खासदार हेमंत पाटील म्हणाले.  यावेळी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख जोतिबा खराटे, हदगाव तालुका प्रमुख  शामराव चव्हाण, भाजप  प्रदेश कार्यकारणी सदस्य सौ.संध्याताई राठोड, प्रफुल्ल राठोड , बीएसएनएलचे महाप्रबंधक पवनकुमार बारापत्रे   विभागीय अभियंता धर्माधिकारी, भ्रमणध्वनी कनिष्ठ अभियंता श्रीगोपाल झंवर , ऑप्टिकल फायबर चे कनिष्ठ अभियंता  विजय तुपकर , हदगाव येथील कनिष्ठ अभियंता अंकित महाद्वाड , किनवट -माहूर चे कनिष्ठ अभियंता एम. रवीकुमार  यांच्यासह इतर तांत्रिक अधिकारी व कर्मचारी सोबत होते. या पाहणी दौऱ्यामुळे बीएसएनएलच्या सर्वच विभागाला खडबडून जाग आली असून तातडीने सर्व उपाय योजना केल्यानंतर लवकरच काही दिवसात मतदार संघातील जनतेला दर्जेदार नेटवर्क आणि ब्रॉडबँड ची सुविधा मिळणार आहे.

लावलेल्या वृक्षाचे संगोपन करा - वर्षा ठाकुर (मुख्य कार्यकारी अधिकारी नांदेड)

लावलेल्या वृक्षाचे संगोपन करा -  वर्षा ठाकुर (मुख्य कार्यकारी अधिकारी नांदेड)
हदगाव (प्रतिनिधी ) - मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकुर बुधवारी सात रोजी  माहुर दौऱ्यावर जात  असताना  हदगाव तालुक्यात सकाळी सात वाजता मनाठा पाटी येथील आदर्श विद्यालयाच्या प्रांगणात मियावाकी  घनवन पध्दतीच्या उपक्रमाचे  त्यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी मनाठा येथील शाळेच्या प्रांगणात मार्गदर्शन करताना म्हणाले की सध्याच्या परिस्थितीत झालेली वृक्ष तोड कोरोना काळात मोठ्या प्रमाणात जाणवत आहे.कारण की आक्सीजन कमी प्रमाणात मिळत असल्याने अनेकांना आपला जीव गमावावा लागला.भविष्यात यापैक्षा बिकट परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी शासन वृक्ष लागवड करण्यासाठी मियावाकी  घनवन सह विविध माध्यमातून वृक्ष लागवड हाती घेतली असून केवळ वृक्षारोपण करून मोकळे न होता त्यांच्या संगोपनाची जबाबदारी प्रत्येक व्यक्तीने घेण्याची गरज आहे.भविष्याच्या दृष्टीने प्रत्येक व्यक्ती एक झाड ही जबाबदारी समजून वृक्ष लागवड करुन त्यांचे संगोपन हि काळाची गरज आहे
प्रत्येक व्यक्तीने एक व्यक्ती एक झाड ही जबाबदारी घेतले पाहिजे यावेळी सांगितले.
सकाळी सात वाजता मुख्य कार्यकारी अधिकारी येणार असल्याचे एक दिवसांपूर्वी कळाले असल्याने नियोजित   बरडशेवाळा मनाठा सह हदगाव तालुक्यात दौऱ्यात गावातील सर्वच विभागाच्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली होती. लावलेली वृक्ष वाचली पाहिजे यासाठी काळजी घ्या मी नंतर नक्कीच भेट देणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. 
यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शरद कुलकर्णी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधिर ठोंबरे, जिल्हा शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, माधवराव सलगर, हदगावचे गटविकास अधिकारी केशव गट्टापोड, बालविकास प्रकल्प अधिकारी उमेश मुदखेडे, उपशिक्षणाधिकारी दिलीप बनसोडे , हदगावचे गटशिक्षणाधिकारी किशन फोले, गंजेवार, मुख्य अभियंता भोजराज , डॉ. झिने, हदगाव तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कदम, जिल्हा परिषद सदस्य साहेबराव सावतकर, मनाठा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण, बरडशेवाळा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मानसपुरे,  डॉ. काळे , मनाठा, सावरगाव, शिबदरा, बरडशेवाळा येथील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच  पुरुषोत्तम बजाज, हिमांशु इंगोले, इस्माईल पिंजारी, पुरभा दहिभाते व गावातील प्रतीष्ठीत नागरिक उपस्थित होते.

Tuesday, 6 July 2021

पाऊस पडावा म्हणून शेतकऱ्यांचे गणपतीला साकडे....

पाऊस पडावा म्हणून शेतकऱ्यांचे गणपतीला साकडे.....    
   सचिन शिंदे तामसेकर          
तामसा  (प्रतिनिधी) -  दिनांक ६ जुलै रोज मंगळवार या दिवशी तामसा येथे शेतकऱ्यांनी पाऊस पडावा म्हणून गणपती देवतेला जलाभिषेक व महाप्रसाद करून विनवणी केली .याकरता येथील शेतकऱ्यांनी वरुणराजा चांगल्या प्रकारे लवकरात लवकर बरसावा म्हणून गावातील शेतकरी बांधवांनी तामसा जुना गावात बालाजी मंदिर येथील गणपती राया ला साकडे घातले. सकाळी अनेक शेतकरी बांधवांनी जलाभिषेक स्वरुपात अभिषेक करून विधिवत पूजाअर्चा केली व पाऊस लवकर पडू दे रे देवा अशी विनवणी गणपती बाप्पाला केली. त्यानंतर सायंकाळी महाप्रसादाचे वाटप सुद्धा शेतकरी बांधवांनी केले .हा कार्यक्रम तामसा जुना गावातील शेतकरी पंडितराव  कोटगिरवार , दिगंबर पिन्नलवार , संजय कोरडे तसेच त्यांच्यासोबत अनेक शेतकऱ्यांनी मिळून मिसळून या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सर्व शेतकरी बांधव आज घडीला पावसासाठी आतुरतेने वाट बघून आहे. 
     पाऊस नाही पडला तर आपल्या शेतातील पिक वाया जाईल व दुबार पेरणी करिता आपल्याला दुसरे आर्थिक नियोजन लावावं लागेल. अशाप्रकारे आपले जास्तीत जास्त आर्थिक नुकसान होईल. त्यामुळे लवकरच  पाऊस पडला पाहिजे .या आशेने या भागातील सर्वच शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. शेतकरी मोठ्या आतुरतेने पावसाची वाट बघत आहेत. वरून रजा आमच्यावर रुसला की काय असे सुद्धा विचार काही शेतकऱ्यांच्या मनात येत आहेत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी मनोभावे जलाभिषेक करून व महाप्रसादाचे वाटप करून गणपती देवाला विनवणी केली आहे.यावेळी ओंकार कोडगिरवार , हरण तसेच युवा शेतकरी मंडळींनी याकार्यात परिश्रम घेतले.

दत्ता महाराज यांची पुण्यतिथी घरीच साजरी करावी द.भ.प. साईनाथ महाराज बितनाळकर यांचे आवाहन

दत्ता महाराज यांची पुण्यतिथी घरीच साजरी करावी 
द.भ.प. साईनाथ महाराज बितनाळकर यांचे आवाहन
माहूर (प्रतिनिधी) - माहूर येथील श्री आनंद दत्त धाम आश्रम उर्फ वसमतकर महाराज मठांचे गुरु आनंदवासी दत्ता महाराज बितनाळकर यांच्या पुण्यतिथी निमित्य आनंद दत्त धाम आश्रम येथे प्रतीवर्षी दि. ८ जुलै रोजी मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येते.मात्र यावर्षी कोरोना महामारीच्या अनुषंगाने सर्व धार्मिक स्थळे प्रशासनाच्या सुचनेनुसार बंद असून गर्दीच्या जमावा बाबत निर्बंध असल्याने यावर्षी दत्ता महाराज यांची पुण्यतीथी साध्या पद्धतीने करण्याचे ठरविण्यात आले आहे. 
        भक्तांनी आनंद दत्त धाम आश्रम माहूर येथे गर्दी न करता आपआपल्या घरीच पुण्यतिथी साजरी करावी. आनंदवासी दत्ता महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्य भक्तांनी आपआपल्या गावात स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, व्यसनमुक्तीचे संकल्प, गरजूना अन्नधान्याची मदत,अन्नदान, बचतीचे मार्ग व जीवाच्या उद्धाराचे विविध संकल्प करून पुण्यतिथी साजरी करण्यात यावी असे आवाहन साईनाथ महाराज बितनाळकर यांनी केले आहे