रितेश गिरी यांची हत्या करणाऱ्या आरोपीस फाशीची शिक्षा द्या
दशनाम गोसावी समाजाची शासनाकडे मागणी
हदगाव (प्रतिनिधी) - मौज कमालपुर ता-औसा जि-लातूर येथील रितेश विरेंद्र गिरी यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करणाऱ्या आरोपीना कठोर कार्यवाही करण्याची मागणी निवेदनाव्दारे दशनाम गोसावी समाज हदगाव बांधवाच्यावतीने तहसिलदाराकडे केली आहे
निवेदनाव्दारे शासनाकडे दिलेली माहिती अशी की, ११ जानेवारी २०२५ रोजी मौजे कमालपूर ता. औसा जि. लातूर येथील रहिवासी रितेश वीरेंद्र गिरी यांची गावातील गावगुंड मेवा दगडु थोरे, राजु फरिद पटेल, मुले प्रसिद्ध थोरे, फिरोज पटेल यांनी धारदार कोयता या शस्त्रांनी डोक्यात, मानेवर, खांद्यावर, पोटावर अत्यंत विकृत व निर्दयीपणे वार करून खून केला. त्यानंतर सदरील मृतदेह कमालपुर येथील सोयाबीनच्या गुळीच्या ढिगात लपवून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.
कमालपुर येथील फरीद पटेल, मेवा थोरे हे अतिशय गुंड प्रवृत्तीचे असुन गावात त्यांची दहशत असल्यामुळे त्यांची मुले व त्यांनी कट रचून संगनमताने रितेश गिरीचा खून करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. या गुन्ह्यातील पाचवा आरोपी त्रिशाला मेवा थोरे हा फरार आहे त्यास अटक करण्यात यावे. उपरोक्त आरोपींनी कटरचून गिरी परिवारातील एकुलत्या एक मुलाचा खुन केला. त्यामुळे रितेशचे कटुंबीय भयभीत आहेत. त्यांना कायदेशीर संरक्षण द्यावे सदरील पीडित परिवाराला कायद्याने संरक्षण व न्याय मिळावा तसेच त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची असुन त्यांना आर्थिक सहकार्य करावे असे निवेदनात नमुद केले असुन निवेदनावर हिंदू धर्मगुरू दशनाम गोसावी आखाडा जिल्हाध्यक्ष राजेश गिरी, पत्रकार प्रा. गजानन गिरी, नारायण गिरी, प्रशांत भारती, शिवराज बन, राहुल गिरी, धनंजय भारती, राजकमल भारती निवघेकर व इतर गोसावी बांधवांच्या स्वाक्षऱ्या व उपस्थिती होती.